Tharla Tar Mag New Year Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सुभेदारांचं घर सोडल्यापासून दोघांची एकमेकांशी नीट भेटही झालेली नाहीये. याशिवाय ‘अर्जुनला भेटायचं नाही, संपर्क ठेवायचा नाही’ असं वचन मधुभाऊंनी सायलीकडून घेतलेलं असतं. त्यामुळे आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाचं ती पालन करत असते.

एसटी स्टँडवर सर्व लोकांसमोर नवऱ्याने प्रपोज करून सुद्धा सायली मधुभाऊंचं वचन निभावत अर्जुनला काहीच उत्तर देत नाही. आपल्या प्रपोजलला काहीच उत्तर न देता सायली का निघून गेली? याचा विचार करून अर्जुनचं मन अस्वस्थ झालेलं असतं. त्याला काही करून सायलीला भेटायचं असतं.

tharla tar mag sayali and arjun express love for each other
ठरलं तर मग! अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी, सायलीने गायलं गाणं! गुडघ्यावर बसून स्वीकारणार लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, पाहा प्रोमो
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”

सायलीशी पुन्हा संपर्क साधायचा असेल, तर सर्वात आधी मधुभाऊंची मनधरणी केली पाहिजे ही गोष्ट अर्जुनला माहिती असते. यामुळे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये अर्जुन मधुभाऊंची भेट घेणार आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं सर्वांसमोर फुटल्यापासून मधुभाऊ अर्जुनचा प्रचंड तिरस्कार करत असतात आणि यामुळेच त्यांनी सायलीला सुद्धा अर्जुनला भेटण्यास मनाई केलेली असते.

हेही वाचा : सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवा व्यवसाय! तृप्तीने अलिबागमध्ये सुरू केला सुंदर Homestay; अभिनेता म्हणाला, “तुझं स्वप्न…”

…तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या

अर्जुन आता आगामी भागांमध्ये ( Tharla Tar Mag ) मधुभाऊंची मनधरणी करताना दिसेल. नव्या प्रोमोमध्ये तो त्यांच्या मागे-मागे चालताना, ‘प्लीज माझं ऐका मधुभाऊ’ असं म्हणताना दिसतोय. पण, त्याचे सासरे काही केल्या त्याचं काहीच ऐकून घेण्यास तयार नसतात. सायलीला भेटण्यासाठी घरापर्यंत आलेल्या अर्जुनच्या तोंडावर मधुभाऊ घराचं दार बंद करुन घेतात.

मधुभाऊ अर्जुनला रागात म्हणतात, “माझ्या सायलीवर तुझी सावली सुद्धा पडायला नको.” पुढे ते जावयाच्या तोंडावर घराचं दार बंद करुन घेतात. पण, अर्जुन दारावर हात मारून पुन्हा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, “एक दिवस तुम्ही स्वत:हून हा दरवाजा उघडाल आणि तुमच्या मुलीचा हात विश्वासाने माझ्या हातात द्याल. तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या…” अर्जुनचा हा निर्धार ऐकून मधुभाऊ त्याला ‘निघ’ म्हणत त्याची हाकलपट्टी करतात.

हेही वाचा : Bigg Boss 18: पत्नीला पाहताच विवियन डिसेनाचे अश्रू अनावर; दोघांचा रोमँटिक प्रोमो पाहून निक्की तांबोळी म्हणाली…

नवऱ्याचा निर्धार ऐकून सायली अश्रू अनावर होतात. भेट झाली नसल्याचं दु:ख असूनही अर्जुनने केलेल्या निश्चयाचं तिला प्रचंड कौतुक वाटतं. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेचा हा विशेष भाग प्रेक्षकांना ४ जानेवारी रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.

Story img Loader