Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीने अखेर अर्जुनसमोर प्रेमाची कबुली दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सीनची आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी अर्जुनने सायलीला भर एसटी स्टँडवर गुडघ्यावर बसून प्रपोज केलेलं असतं. पण, तेव्हा मधुभाऊंना दिलेल्या वचनामुळे सायली आपल्या नवऱ्याला कोणतंच उत्तर न देता निघून जाते. त्यामुळे मिसेस सायलीच्या मनात नेमकं काय आहे हा विचार करून अर्जुन देखील संभ्रमात पडतो.

अर्जुन काही केल्या आपले प्रयत्न सोडत नाही. कल्पनाने घराबाहेर काढल्यापासून सायली मधुभाऊंच्या घरी जाऊन राहत असते. त्यामुळे, अर्जुन सुद्धा वारंवार त्याठिकाणी आपल्या बायकोला भेटण्यासाठी जात असतो. प्रियाला हे अजिबात आवडत नसतं. सायली आणि अर्जुनच्या नात्यात तिला दुरावा निर्माण करायचा असतो. प्रिया संधी साधून पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सुभेदार कुटुंबीयांना दाखवते. तसेच अर्जुन आजकाल रोज चाळीत ( मधुभाऊंच्या घरी ) जातो. यामुळे त्याचं नाव खराब होईल अशी भीती सुद्धा ती, पूर्णा आजी आणि कल्पनाच्या मनात निर्माण करते. यावर पूर्णा आजी या सगळ्यावर लवकरात लवकर कायमचा उपाय केला पाहिजे असा निर्णय घेते.

beed accident loksatta
अपघातात नियोजित वधूच्या पित्यासह दोन ठार, केज-बीड मार्गावरील घटना
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
zee marathi lakshmi niwas jahnavi shocked after seen jayant real face
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
widow marriage news marathi
बुलढाणा : दिराने विधवा वहिनीचे लग्न जुळविले…पित्याच्या भूमिकेत कन्यादानही केले…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो

पूर्णा आजीने घेतला मोठा निर्णय

दुसरीकडे, अर्जुनवर चाळीत हल्ला केला जातो. आपल्या नवऱ्याला मारहाण होतेय हे पाहताच सायलीचा जीव कासावीस होतो. ती पटकन “अहो…” ओरडते. एवढ्यात अर्जुनवर पाठीमागून वार केला जातो आणि तो जमिनीवर पडतो. यानंतर त्याची शुद्ध हरपते. हे सगळं पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते. मधुभाऊंचा हात झटकून ती नवऱ्याकडे जाते. त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. शेवटी सायली आपल्या प्रेमाची कबुली देत, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर असं म्हणते. बायकोचे हे शब्द ऐकताच अर्जुन पटकन डोळे उघडतो…त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.

पुढे, सायली अर्जुनला मलमपट्टी करत असते. तो प्रेमाने आपल्या बायकोला धीर देतो आणि म्हणतो, “एक दिवस घरचे सगळे तुम्हाला परत घरी बोलावतील. सर्वांचं मन जिंकून तुम्ही पुन्हा घरी याल.” हे सगळं झाल्यावर अर्जुन घरी जातो. इतक्यात वडील प्रताप सुभेदार त्याला म्हणतात, “जरा बस आम्हाला तुझ्याशी बोलायचंय.” यावर अर्जुन म्हणतो, “काय झालं डॅड?” यानंतर पूर्णा आजी तिचा महत्त्वाचा निर्णय सर्वांना सांगते.

आता झालं गेलं विसरून जाऊया आणि आपण सगळे पुढचा विचार करूयात. तुझ्या आणि तन्वीच्या ( प्रिया ) लग्नाचा निर्णय घेतल्याचं पूर्णा आजी नातवाला सांगते. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तो, या निर्णयावर संताप व्यक्त करणार हे प्रोमोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आता या सगळ्यावर अर्जुन काय निर्णय घेणार, घरच्यांना काय सांगणार? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader