Tharla Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीने आपल्या प्रेमाची कबुली अर्जुनसमोर दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून मधुभाऊंच्या वचनामुळे सायली-अर्जुनमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, सायली कोल्हापूरला जायला निघाल्यावर अर्जुनने तिला एसटी स्टँडवर गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी मधुभाऊंच्या वचनामुळे सायली अर्जुनला काहीच उत्तर न देता निघून गेली होती. पण, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात तिने आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

गुंडाशी मारामारी करताना अर्जुनवर मागून वार करण्यात येतो. यामुळे तो तोल जाऊन जमिनीवर कोसळतो. नवऱ्याची ही अवस्था पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते. ती मधुभाऊंचा हात झटकून अर्जुनजवळ जाते. त्याला उठवण्याचा प्रयत्न करते…शेवटी सायली म्हणते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर… बायकोच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अर्जुन अलगद डोळे उघडतो. त्याचा आनंद पार गगनात मावेनासा होतो.

Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
zee marathi lakshmi niwas jahnavi shocked after seen jayant real face
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…

एकीकडे अर्जुन-सायलीचं नातं बहरत असताना दुसरीकडे, सुभेदारांच्या घरी जाऊन प्रिया त्यांचे सायलीविरोधात कान भरते. यामुळे लवकरात लवकर अर्जुनला सायलीपासून दूर करुन तन्वी ( प्रिया ) आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचं असा निर्णय पूर्णा आजी घेते. या निर्णयाबद्दल ती अर्जुनला सांगते. पण, अर्जुन येत्या भागात प्रियाबरोबर लग्न करण्यास स्पष्ट नकार देणार असल्याचं पाहायला मिळेल.

प्रियाबरोबर लग्न करणार नाही असा ठाम निर्णय अर्जुन कुटुंबीयांना सांगतो. पूर्णा आजीने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातल्याची बातमी आता सायलीपर्यंत पोहोचणार आहे. कुसुमबरोबर याविषयावर चर्चा करताना सायली एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.

सुभेदारांच्या घरासाठी प्रिया अजिबात योग्य मुलगी नाही. त्यामुळे ठरलं तर मग मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार…अर्थात, आधी दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने आता अर्जुनबरोबरच पुन्हा लग्न करण्याचा निर्णय सायलीने घेतला आहे. मालिकेचा हा विशेष भाग २७ जानेवारीला प्रसारित केला जाईल.

दरम्यान, आता सायली आणि अर्जुन कसं लग्न करणार, सुभेदार कुटुंबीय यावर काय निर्णय घेणार या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader