– दिलीप ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची काही खास वैशिष्ट्ये आहेत, ती कदाचित योगायोगाने देखील असतील… १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित करणे हे देखील तसे खासच वैशिष्ट्य आहे. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘नया दौर ‘(१९५७) पासून अनेकदा तरी ही खासीयत साध्य झालीय. आणि काही वेळा विशेष उल्लेखनीय यशही लाभलयं. ‘नया दौर ‘ या चित्रपटाचे कथानकच या १५ ऑगस्ट रोजी तो प्रदर्शित करावा असा होता. वाढते औद्योगिकीकरण आणि त्यामधून वाढणारी संभाव्य बेकारी या सूत्राभोवती हा चित्रपट आहे. ग्रामीण भागातील रिक्षांचा व्यवसाय मोटारबस आल्याने मोडकळीस येईल याचा संभाव्य धोका या चित्रपटात साकारलाय. तो काळ तर अनेक ठिकाणी माणूसच रिक्षा ओढतोय याचा होता ( ‘दो बिघा जमीन ‘ आठवा.) ‘नया दौर ‘मध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे सामर्थ्य आहे. दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. आणि हा सर्वकालीन क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. कदाचित आज आश्चर्य वाटेल, पण या चित्रपटाची कल्पना चोप्रासाहेबांनी चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांना ऐकवली तेव्हा त्यानी हा माहितीपटाचा विषय आहे असं म्हटलं, पण ते या विषयावर ठाम विश्वास ठेवून राहिले आणि त्याचे त्याना यशही मिळून ते योग्यच विचार करत असल्याचे सिध्द झाले.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tradition of film releasing on 15 august started in 1957 with naya daur
First published on: 13-08-2018 at 14:53 IST