Manoranjan News Live Updates : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टी विरुद्ध दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा वाद शिगेला पोहोचला आहे. यावर अनेक कलाकार पुढे येऊन प्रतिक्रिया देत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सध्या कान्स महोत्सव २०२२ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, हेली शाह, हिना खान यांच्या लुकची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे. सध्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाची बरीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. आता देखील त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत असताना त्याने योगी आदित्यनाथ यांचं कौतुक देखील केलं आहे.
दाक्षिणात्या सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे जगभरात चाहते आहेत. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलासृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. ज्युनिअर एनटीआर दिसायला जरी साधा असला तरी तो कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले या अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्याच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील ते खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही? असे आशा भोसले म्हणाल्या.
झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अभिनेत्री सारा अली खान सध्या लंडनमध्ये सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. पण यावेळी ती मित्र-मैत्रीण किंवा कुटुंबाबरोबर नव्हे तर एकटीच लंडनमध्ये फिरत आहे. याचदरम्यानचे काही फोटो साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
दिग्दर्शक करण जोहरचा आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही तासांमध्येच हा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं कॉपी केल्याचा आरोप करणवर होत आहे.
'चंद्रमुखी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा रंगत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान करणने बॉलिवूड आणि साऊथ वादावर आपलं मत व्यक्त केलं.
कंगना रणौतला सलमान खानने संयज लीला भन्साळी यांना भेटण्याचा फार पूर्वी सल्ला दिला होता. पण तेव्हा नेमकं काय घडलं? हे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अभिनेता सलमान खान आणि शहनाज गिलचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांच्यासोबत चित्रपटाबाबत मतभेद झाले आहे. मात्र आता काहीतरी वाद झाल्याने त्याने या चित्रपटातून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे.