बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यांच्या यादीत संजय लीला भन्साळी यांचे नाव नेहमी आघाडीवर घेतले जाते. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसह इत्यादी चित्रपटांमुळे तो उत्तम दिग्दर्शक असल्याचेही बोललं जात आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटात फार क्वचित चुका असतात. कारण संजय लीला भन्साळी जेव्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर असतात, त्यावेळी त्यांच्याकडून कोणतीही चूक होण्याची शक्यता फार कमी असते. मात्र दुसरीकडे सेलिब्रेटींकडून एखादी गोष्ट करुन घेणं, हे फार कठीण असते. संजय लीला भन्साळी हे स्वभावाने अतिशय तापट असल्याचे बोललं जाते. अनेकदा चित्रीकरणादरम्यान ते कलाकारांवर भडकतात. एकदा तर ते बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यावर भडकले होते. अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही जोडी संजय लीला भन्साळी यांची सर्वात आवडती जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघांनी 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'रामलीला'मध्ये एकत्र काम केले आहे. रणवीर आणि दीपिकाचे हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. मात्र या चित्रपटांदरम्यान रणवीरला संजय लीला भन्साळींच्या रागाचा सामना करावा लागला. त्यावेळी रणवीरला त्यांचा प्रचंड ओरडाही मिळाला. 'पद्मावत' चित्रपटातील काही कलाकारांनी याबाबतचा खुलासा केला आहे. 'S Ravi Varman' won the Zee Cine Awards for the best cinematography in 'Goliyon Ki Rasleela Ram–Leela' pic.twitter.com/LLrqzi2qiv — Bhansali Productions (@Bhansali_Prod) February 11, 2014 'पद्मावत' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकदा संजय लीला भन्साळी हे रणवीरवर प्रचंड रागवले होते. कित्येक वेळा रणवीरला त्यांच्या रागाचाही सामना करावा लागला होता. इतकंच नव्हे तर संजय लीला भन्साळींनी रणवीरला "चल घरी जाऊ या, तुझ्याकडून हे होणार नाही," असेही म्हटले होते. याचा रणवीराला प्रचंड राग आला होता. View this post on Instagram A post shared by Bhansali Productions (@bhansaliproductions) तर दुसरीकडे दीपिका पदुकोण मात्र त्यांची फार लाडकी अभिनेत्री असल्याचे बोललं जाते. दीपिका ही चित्रीकरणादरम्यान फार लक्ष देऊन काम करते. भन्साळींच्या सर्व सूचनांचे ती काळजीपूर्वक पालन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ते कधीही तिच्यावर रागवत नाही, असेही त्या कलाकारांनी सांगितले होते.