आपल्या अंतरंगातच जे शाश्वत आत्मसुख आहे त्याची जाणीव होत नाही आणि अशाश्वत अशा सुखासाठी माणूस लाचार होऊन दुनियेत स्वत:ची फरपट करीत राहतो. त्यायोगे कशाचीच शाश्वती न वाटून चिंता आणि भीतीनंही त्याचं जीवन झाकोळतं. थोडक्यात माणूस जे काही करतो त्याचंच फळ त्याच्या पदरात पडल्याशिवाय राहात नाही. सत्कर्माचं फळही चांगलंच मिळतं आणि दुष्कर्माचं फळ तापदायकच असतं. त्यामुळे मनुष्यजन्माची जी संधी लाभली आहे तिचा योग्य वापर करायला संत नेहमीच सांगतात. जसं कराल, तसं पावेल आणि तसंच भोगाल, हे संतसत्पुरुष सातत्यानं सांगतात. अगदी जवळ असलेलं सुख सोडून, मृगजळवत असलेल्या, केवळ भासमान असलेल्या सुखामागे माणूस धावत राहातो आणि ते सुख तर कधी जवळ येतच नाही आणि जवळचं सुख मात्र दिसेनासं, जाणवेनासं होतं, याकडे समर्थानी गेल्या श्लोकात लक्ष वेधलं. आता माणूस जसं करतो तसंच भोगतो, हे सूत्र पुढल्या श्लोकात समर्थ मांडत आहेत. प्रथम ‘मनोबोधा’चा हा १४०वा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयाचें तया चुकलें प्राप्त नाहीं।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realization of eternal happiness
First published on: 08-11-2017 at 01:49 IST