मनोबोधाच्या १५८व्या श्लोकात शेषाचा उल्लेख आहे. समर्थ म्हणतात, ‘‘स्वयें शेष मौनावला स्थीर राहे।’’ आधीचे सर्व चरण हे शास्त्र धुंडाळूनही परमतत्त्वाचं ज्ञान कसं होत नाही, हे सांगणारे आहेत. त्या अनुषंगानं शेषाच्या मौनाचा अर्थ पाहावा लागेल. मुळात शेष कोण आहे? पुराणकथा सांगतात त्यानुसार महाविष्णु त्या शेषावर विराजमान आहे आणि लक्ष्मी त्या महाविष्णुची चरणसेवा करीत आहे. या शेषाला हजारो जिव्हा आहेत आणि त्याचं नाव अनंतशेष आहे. शेष म्हणजे शिल्लक! या अर्थानं पाहाता हा जो अनंतशेष आहे तो या सृष्टीच्या अंतानंतरही तसाच राहातो, या पुराणमतांचा संदर्भ लागतो. म्हणजेच सृष्टीच्या आधीपासून त्या हरीबरोबर हा शेष होता. आता हरीचा अर्थ आपण सद्गुरू घेत आहोत त्यानुसार जो या सृष्टीच्या आधीपासूनही सद्गुरूला जाणत आहे त्यालाही सद्गुरूतत्त्व काय आहे, हे पूर्णपणे उमगलं नाही आणि म्हणून तो मौनच आहे! नुसता मौन नाही तो स्तब्ध आहे.. स्थिर आहे!! आपण मात्र अस्थिर आहोत आणि तसे का आहोत, याचं कारण  समर्थ याच १५८व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात सांगतात. हे कारण म्हणजे, आपण मीपणाची जाणीव सांडलेली नाही. ती जोवर सांडली जात नाही तोवर मीपणानं जगातलं रूतणं थांबत नाही. समर्थ म्हणतात :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 13-12-2017 at 01:33 IST