सदाशिव पेठेत सोसायटीच्या गेटसमोर गाड्या पार्क करुन जाणाऱ्या लोकांमुळे बंड्या अगदी हैराण झाला होता. त्याने गेटवर एक पाटी लिहून ठेवली आणि अचानक सोसयटीसमोर गाड्या लागणे बंद झाले !
बंड्याने लिहिले होते-
“सदर जागा भुताटकीने ग्रस्त असून पार्क करताना ठणठणीत असलेल्या गाडीतली हवा, गाडी काढताना मात्र गेल्याचे लक्षात येते. चालकांनी दक्ष राहावे !”