संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते. कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे. एकदा तो धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते. एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही. मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत. यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, माणूस पाण्यात विरघळतो.