१० तबलिगींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.तबलिगी जमातच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे करोनाचा प्रादुर्भाव कसा वाढला हे देशाला ठाऊक आहेच. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे.या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप झाले. आता या प्रकरणातील १० परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्याने ही कारवाई करण्यात आली.