राज्यात शनिवारी करोनाच्या २,७३९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८ झाली आहे. दिवसभरात १२० रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईतील ५४, तर पुणे व ठाणे येथे प्रत्येकी दहा जणांचा समावेश आहे. राज्यात एकूण २,९६९ मृत्यू  झाले असून त्यापैकी १,५७७ मुंबईत नोंदविण्यात आले.

राज्यात शनिवारी २,२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. शनिवारी कोरोनाच्या २,७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.