कोल्हापूर येथून मुंबईमध्ये जकात चुकवून आणलेली ४५ लाख रुपये किमतीची १२५ किलो चांदी पालिकेच्या दक्षता विभागाने मंगळवारी सकाळी काळबादेवी येथून जप्त केली. मुंबईत चांदी घेऊन आलेल्या अशोकभाय मारवाडीची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे ही चांदी एसटीतून आणण्यात आली होती. कोल्हापूर येथून मुंबईत एसटीतून १२५ किलो चांदी आणण्यात येणार असल्याची माहिती दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे सापळा रचला होता.