मुंबई : भिवंडीतील रोशन बाग भागातील दिवान शाह मदरशात शिकणाऱ्या २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ५ मुलांची प्रकृती गंभीर आहे. मदरशात बिर्याणी खाल्यानंतर त्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.


या विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉ. अनिल थ्रोटा म्हणाले, काल संध्याकाळी मदरशात बिर्याणी खाल्यानेच त्यांना उलट्यांचा त्रास झाला. कारण या उलट्या ही अन्नातील विषबाधेची लक्षणे आहेत. आमच्या रुग्णालयात या २६ विद्यार्थ्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.