मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण शहरातही भिंत कोसळली आहे. ही भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला आहे. मुंबईत रात्रभर पावसाचा जोर आहे. त्याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. अशात कल्याण या ठिकाणी भिंत कोसलून तिघांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण या ठिकाणी असलेल्या नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळली आहे. रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. मुसळधार पावसामुळेच ही भिंत खचली आणि कोसळली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.