राज्यात कोरोनाबाधित असलेल्या १७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये आठ रुग्ण मुंबईचे असून पाच पुण्याचे, नागपूरचे दोन तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे तर आज  दोन करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले.  त्यामुळे सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात मृत्यू पावलेल्या दोन करोना बाधित रुग्णांपैकी एका  ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते तर करोना बाधित असलेल्या दुसऱ्या ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.  त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता दहा झाली आहे.

राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत.   १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थांनी स्थापन केलेल्या विलगीकरणात मध्ये आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

राज्यातील रुग्णांचा तपशील

मुंबई  ९२ ,पुणे ( शहर व ग्रामीण भाग )४३ ,सांगली   २५ ,

ठाणे  २३ ,नागपूर   १६, यवतमाळ   ४, अहमदनगर ५ , सातारा, कोल्हापूर २ , औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक प्रत्येकी  १ , इतर राज्य — गुजरात १

एकूण २२० त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू

आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई— १४, पुणे— ७, पिंपरी चिंचवड— ९, यवतमाळ— ३, अहमदनगर— १, नागपूर— ४, औरंगाबाद— १