राज्यात गेल्या २४ तासांत ४७९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत राज्यभरात २१ हजार नवे रुग्ण आढळले.

राज्यात गेल्या २४ तासांत १९,४७६ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या राज्यभरात २ लाख ७३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ३३,८८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ८३ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ५६ लाख ४६ हजार १० इतकी झाली आहे. दिवसभरात देशात १०८५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ९० हजारांवर पोहोचली आहे.आतापर्यंत ४५ लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ८१.२५ टक्के आहे.