दिल्ली जिंकल्यानंतर आता ‘आप’ने आपले लक्ष मुंबईवर केंद्रित केले आहे. मुंबई आणि महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ‘आप’ने रविवारी सांताक्रुझ येथे ‘आपली मुंबई रॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता सांताक्रुझ रेल्वे स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटीवरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.