पावसाळ्यासह संपूर्ण वर्षभरात तांत्रिक कारणास्तव लोकल विस्कळीत झाल्यास बिघाडाची व पुढील वेळापत्रकाची अचूक माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील होते. त्याला आता यश आले आहे. मोटरमन, गार्डच्या के बिनमध्ये ‘मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिके शन’ यंत्रणा बसवण्यात आली असून ही यंत्रणा रेल्वे नियंत्रण कक्षासह प्रत्येक महत्त्वाच्या विभागाशी जोडण्यात आली आहे. परिणामी या विभागांशी संपर्क साधून माहिती घेणे मोटरमन व गार्डना शक्य होणार आहे. या यंत्रणेचे उद्घाटन सोमवारी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले.

पावसाळ्यात रुळावर पाणी साचल्यास किं वा एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते. अशावेळी लोकल एकाच जागी खोळंबून राहतात आणि लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नेमक्या कोणत्या कारणामुळे खोळंबा झाला हे कळतच नाही. परिणामी, प्रवासी धोका पत्करून लोकलमधून उतरून रुळावरून चालत पुढील स्थानक गाठतात. असे प्रकार स्थिती वर्षांनुवर्षे घडतच आहेत.

लोकल चालवताना मोबाइलवर बोलण्यास मोटरमनला मनाई आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास फक्त गार्डकडून याची कल्पना प्रथम जवळच्या स्थानकातील स्टेशन मास्तर, रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यामुळे लोकल का थांबली याचे कारण तात्काळ गार्डकडे व्हॉकीटॉकीद्वारे संपर्क साधून विचारले जाते, तर रेल्वे व्यवस्थापन कक्षात असलेल्या मोठय़ा स्क्रीनवर लोकलची सद्यस्थिती समजते. परंतु सक्षम अशी यंत्रणा नसल्याने मोठे अडथळे येतात. त्यामुळेच मोटरमन, गार्ड व नियंत्रण व व्यवस्थापन कक्षात सुसंवाद राहावा आणि अचूक माहिती मिळावी. तसेच प्रवाशांनाही त्याद्वारे वेळेत माहिती पोहोचावी म्हणून मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गार्ड आणि मोटरमनच्या के बिनमध्ये ही यंत्रणा कार्यरत राहणार असून ती नियंत्रण कक्षाशी जोडलेली असेल. एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास मोटरमनदेखील गार्डबरोबर लोकलच्या विभाग नियंत्रकाशी संपर्क साधू शकतो. शिवाय नियंत्रण कक्ष, रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधता येईल. एखाद्या घटनेच्या माहितीची देवाणघेवाण के ल्यावर प्रवाशांनाही अवघ्या काही मिनिटांत अचूक माहिती मोटरमन, गार्डकडून उद्घोषणेमार्फत देण्यात येईल, अशी माहिती कन्सल यांनी दिली.

१५ डबा लोकलच्या अतिरिक्त फे ऱ्या एप्रिलपासून

अंधेरी ते विरापर्यंत धिम्या मार्गावर १५ डबा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून त्याच्या अतिरिक्त लोकल फे ऱ्या चालवण्यात येतील, अशी माहितीही कन्सल यांनी दिली. शिवाय १५ उपनगरीय स्थानकात एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली असून आणखी २५ स्थानकात ही यंत्रणा लवकरच बसवली जाणार आहे. यामध्ये सीसी टीव्ही कॅ मेरा, डोअर मेटल डिटेक्टरसह अन्य सुरक्षा यंत्रणा आहे.