दिवाळीनिमित्त मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी विशेष गस्त सुरू केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या विशेष मोहिमेत ८४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दिवाळीदरम्यान सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढू शकते. ते रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्त सुरू केली आहे. रविवापर्यंत वाहन तपासणीची मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.