गँगमनची अपुरी संख्या त्यांच्या जीवावर बेतत असताना २०१०-११मध्ये झालेल्या रेल्वे भरतीमध्ये निवड झालेल्या १०२१ तरुणांना रेल्वेने अद्याप सेवेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. मात्र, भरती करताना आम्ही २० टक्के जास्तीची भरती केली होती, असे सांगत रेल्वेने त्यांचा नोकरीचा हक्क डावलला आहे.  आता या तरुणांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शुक्रवारपासून ते आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.