बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी ५० लाखांची मदत केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करणार असल्याचे अक्षय काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार अक्षयने आज ५० लाख जलयुक्त शिवारसाठी मदतनिधी म्हणून देऊ केले. याआधीही अक्षयने पुढाकार घेऊन मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना दर महिन्याला १५ लाख असे सहा महिने अर्थात एकूण ९० लाखांची मदत जाहीर केली होती.