राज्यभरातून आपल्या कामांसाठी येणाऱ्या जनतेला मंत्रालयात प्रवेशपत्र मिळविताना तासन्तास ताटकळत रांगेत थांबावे लागते. त्यांना सुलभपणे मंत्रालयात प्रवेश मिळावा, अशी मागणी करतानाच आमदार बच्चू कडू यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर विधानसभेत शरसंधान केले. जनतेचा मंत्रालयात प्रवेश सुकर करण्यासाठी ऑनलाइन पद्धती लवकरच सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जनता राजा आहे आणि कर्मचारी हे सेवक असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात प्रवेशपत्र मिळविताना बराच काळ रांगेत उभे राहावे लागते, असे ते म्हणाले.