शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योपाययोजना राबविण्याकरिता भाजप सरकारने सुरू केलेली बळीराजा चेतना योजना महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणात घट झालेली नसून, ही योजना अपयशी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या योजनेवर आतापर्यंत ७० ते ८० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. मानसिकदृटय़ा खचलेला शेकतरी आत्महत्येकडे वळतो. अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणे, यासाठी बळीराजा चेतना योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून २४ जुलै २०१५ पासून उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्य़ांत राबविण्यास सुरुवात केली होती.