एक दिवसात मूल्यांकन पूर्ण करण्याचा आदेश नसल्याचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांची मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या आकलनाची पडताळणी करण्यासाठी घेतलेल्या पायाभूत चाचणीच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील शाळा व शिक्षकांची मोठी धांदल उडाली. परीक्षा झाल्यावर लगेचच म्हणजेच त्याच दिवशी सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण करण्याचे आदेश मिळाल्याने मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये एका विषयाचे मूल्यांकन दुसऱ्या विषयाच्या शिक्षकांनी करणे यासारखे गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. नियोजनातील अभावामुळे दरवर्षी चर्चेत असणारी ही पायाभूत चाचणी यशस्वी करण्यामध्ये यंदाही सरकारला अपयश आले आहे. मूल्यांकनातील घोळामुळे ही चाचणी फोल असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basic infrastructure inspection in mumbai schools
First published on: 08-09-2017 at 00:22 IST