मुंबई : सुरक्षेचे कुठलेही नियम न पाळता रस्त्यावर सर्रास फिरणाऱ्या भिकाऱ्यांद्वारे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आणि भिक्षेकरी प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याची मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर दरवटकर यांनी अ‍ॅड्. शेखर जगताप यांच्यामार्फत याबाबत याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

वास्तविक भिक्षेकरी प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी याचिकाकर्त्यांंनी गेल्या वर्षी याचिका केली होती. न्यायालयानेही त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आणि महिला व बाल कल्याण विभागाला दिले होते. पुण्यातील रेनबो या संस्थेने भिकाऱ्यांबाबत २०१६ मध्ये सर्वेक्षण केले होते. त्यात प्रत्येक ३१ लाख लोकसंख्येमागे १० हजारांहून अधिक मुले ही भीक मागताना आढळून आली. त्यात ५८ टक्के  मुलगे, तर ४२ टक्के  मुलींचा समावेश होता. त्याच आधारे याचिका करण्यात आली होती. २०१३ मध्ये सरकारने भिक्षेकरी प्रतिबंध कायदा के ला. त्यानुसार भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सुरू करण्याचे, तेथे त्यांना व्यावसायिक कौशल्याचे शिक्षण देण्याचे धोरणही आखण्यात आले. त्यामुळे या समस्येचे निराकरण होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. म्हणूनच या भिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.