सलामान खानने याकुब मेमनच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटमुळे सर्व स्तरातुन त्याच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमानचा जामिन रद्द व्हावा अशी मागणी केली आहे. या मागणीचे पत्रही शेलार यांनी राज्यपाल सी.व्ही. राव यांना पाठवले आहे.
‘सलमान खान हा स्वतः दोषी असून त्याची दुसऱ्या दोषीची शिक्षा माफ करण्याची मागणी आहे, यातून सलमानने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे’ असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सलमान खानला सर्वोच्च न्यायालय आणि कायद्याबाबत आदर नाही. एकप्रकारे सलमान खान गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करायला हवा अशी मागणी शेलार यांनी केली आहे.


१९९३ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी निर्दोष असणाऱ्या याकूबला फाशी दिल्यास ती माणुसकीची हत्या ठरेल, असे ट्वीट करत सलमान खानने खळबळ उडवून दिली आहे.