‘ओमान एअर’ या कंपनीच्या क्वालालंपूरला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले.
मस्कतवरून निघालेले हे विमान हवेत असतानाच विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर ते एका मोकळ्या धावपट्टीवर नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची माहिती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.