मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरु आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व जलद गाड्यांची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे अनेक प्रवाशांना कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवली स्थानकावर काही प्रवाशांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. तसंच नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानेही वाहतुकीवर परिणाम झाला असून ठाण्याहून सीएसएमटीकडे येणारी जलद वाहतूक ठप्प आहे.