मुंबईत बुधवारपासून पावसाने धरलेला तालाचा तडाखा मध्य रेल्वेसेवेला पोहचला होता. आज (शुक्रवार) पुन्हा मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, या मार्गावरील रेल्वे १०-१५ मिनिटे उशिराने येत आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेसचे इंजिनमध्ये ऐनवेळी अडथळा आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तसेच, इंद्रायणी एक्स्प्रेसही एक तास उशिराने धावणार आहे.