आसनगावजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलवर याचा परिणाम झाला आहे. हा बिघाड अप मार्गावर झाल्याने मुंबईच्या दिशेने येणा-या वाहतुकीचा खोळंबा झाला.
दरम्यान, गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना गैससोयीला सामोरे जावे लागत आहे.