आपल्या न्याय-हक्कांसाठी पुण्यातील समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या लाठीमारप्रकरणी सखोल अहवाल त्यांनी मागितला आहे.

त्याचबरोबर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी देखील या आंदोलनकर्त्या मुलांच्या प्रलंबित मागण्यांची माहिती मागितली होती. त्यानुसार, या मुलांच्यावतीने उद्या आठ जणांचे शिष्टमंडळ मंत्रालयात मागण्या घेऊन येणार आहेत. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांकडून कळते.