कमाल तापमानात ६.५ अंश से. घट

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरात उकाडा जाणवत असताना बुधवारी अचानक कमाल तापमानात जवळपास सहा अंश से. घट झाली आहे. समुद्र किनाऱ्यावरील वारे  वायव्यकडे वाहत असल्याने तापमान कमी झाल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
Mumbai temperature at 37 degrees
मुंबईचा पारा ३७ अंशावर
Highest temperature recorded in Akola city
अकोल्यात उन्हाच्या झळा, तापमान ४२.८ अंशांवर; विदर्भात तापमानाच्या पाऱ्यात वेगाने वाढ
only 32 percent water stock left in mumbai dams
Water stock in Mumbai Dams : मुंबईच्या धरणांत केवळ ३२ टक्के पाणी; फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा

तापमानाच्या चढ उतारामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे याबाबत शंका उपस्थित होत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात शक्यतो तापमान कमी असते. असे असताना मात्र गेल्या सोमवारी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश से. पोहचला होता. मंगळवारी पुन्हा तापमानात घट झाल्याचे दिसले.  बुधवारी मात्र कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा  खाली येऊन ६.५  अंश से. घट झाल्याचे हवामानखात्याकडून सांगण्यात आले.

बुधवारी दुपारी उकाडा जाणवत असताना मात्र संध्याकाळी हवेत गारवा जाणवत होता. बुधवारी सांताक्रुझ येथे २८.८ आणि कुलाबा येथे २९.२ कमाल तापमानाची नोंद झाली आहे.