राज्यातील देवेंद्र फडणवीसांचे सरकार कोसळल्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, ज्या कारणासाठी महाविकास आघाडीचे सरकार अद्याप अस्तित्वात येऊ शकलेले नाही त्या किमान समान कार्यक्रमाला सोनिया गांधींनी संमती दिली आहे, याबाबतचे वृत्त एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज (मंगळवार) संध्याकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर किमान समान कार्यक्रमाचे प्रकाशन केले जाणार असल्याचे कळते.

त्याचबरोबर या तिन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापन करण्यासाठीची कार्यपद्धती देखील आता अंतिम झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.