मुंबई : बुधवारी मुंबईत ८३० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे. बुधवारी ८३० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १८ हजारांपुढे गेली आहे. सध्या १४ हजार ९०७ उपचाराधीन रुग्ण आहेत. धारावीत सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस एकही नवीन रुग्ण आढळला नाही. मात्र बुधवारी एका रुग्णाची नोंद झाली. धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या के वळ १० उपचाराधीन रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात ५०३ करोना रुग्ण ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ५०३ करोना रुग्ण आढळून आले. तर ३७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ५०३ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली १३३, ठाणे ११७, नवी मुंबई ७४, मिरा भाईंदर ६५, ठाणे ग्रामीण ६४, बदलापूर २४, अंबरनाथ ११, उल्हासनगर आठ आणि भिवंडीत सात रुग्ण आढळून आले. ३७ मृतांपैकी बदलापूर १७, नवी मुंबई सहा, ठाणे पाच, अंबरनाथ तीन, कल्याण-डोंबिवली तीन, मिरा भाईंदर आणि उल्हासनगरमध्ये एकाचा मृत्यू झाला.