मुंबईहून कर्जतकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन बदलापूर ते वांगणी दरम्यान बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी सायंकाळी मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक सव्वा तास बंद झाली होती. परिणामी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मालगाडी सुरू करण्यासाठी कल्याणहून इंजिन आणावे लागले.