यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि अन्य सार्वजनिक उत्सव सामाजिक जाणीव जपत साजरे करा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दादर येथे केले.
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर गणेशोत्सव मंडळांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी भाजपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, न्यायालयात लढा देण्यासाठी स्थापलेल्या समितीचे प्रमुख सुनील राणे यांच्या पुढाकाराने शिवाजी मंदिर येथे सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहिहंडी व रामलीला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे संमेलन झाले. ते म्हणाले, नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे उत्सव साजरे करू नका, मात्र यातून मार्ग काढण्याची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी दाखविली. याचवेळी मंडळे विविध उपक्रम राबवित आहेत हे विसरून चालणार नाही.