अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी स्वंतत्र नियमावली तयार करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला केली.
‘असोसिएशन ऑफ इंडियन हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट’ (आहार) या संघटनेने यासंदर्भात याचिका केली असून मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाला नोटीस बजावत राज्य सरकारला हॉटेल्स व रेस्टॉरंटसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत सूचना केली.
२००६ सालच्या अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या तसेच या कायद्याअंतर्गत २०११ मध्ये करण्यात आलेल्या नियमावलीच्या वैधतेला असोसिएशनने याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये अन्न उत्पादनाची प्रक्रिया होत नसून तेथे केवळ शिजवलेल्या अन्नाची सेवा उपलब्ध केली जाते. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार घालण्यात आलेल्या अटी या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना लागू होऊ शकत नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
हा कायदा केवळ अन्न उत्पादनापुरता मर्यादित आहे. अन्न शिजवणे म्हणजे त्याचे उत्पादन करणे होत नाही, असा युक्तिवाद असोसिएशनने याचिकेत केला आहे.

The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर
High Court, Expresses Anger, maharashtra Government, Delay, Taking Possession, New High Court Building, Site in Bandra,
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी