अयोध्येतील राममंदिराचे ई-भूमिपूजन करावे, असे सांगणारे कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना ई -पासही देऊ शकलेले नाहीत. दलालांचा सुळसुळाट झाला आहे. कोकणात जाण्यासाठी विशेष एसटी गाडय़ा सोडण्यात येतील, असे सांगितले गेले. त्या कुठे आहेत, असा सवाल करीत राज्य सरकारने आता कोकणी माणसाचा अंत पाहू नये, असा इशारा भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिला आहे.

गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणात राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी धावपळ सुरू असून ई-पासही उपलब्ध होत नाहीत.