मी गेल्याच महिन्यात लेखी आदेश काढून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना अनेक विषयांमध्ये निर्णयांचे स्वतंत्र अधिकार दिले, केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरु असलेल्या प्रकरणांचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. तरीही त्यांची तक्रार कशासाठी आहे, हेच समजत नाही, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. उलट शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी भाजपच्या राज्यमंत्र्यांना काहीच अधिकार दिले नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्र्यांना अधिकार नाही, काम करु दिले जात नाही, त्यामुळे सरकारमध्ये मंत्री राहून उपयोग काय, अशी तक्रार शिवसेना नेते व राज्यमंत्री संजय राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. जनतेची कामे करता येत नसतील, तर राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडण्याची तयारीही त्यांनी दाखविली. त्यामुळे आपली भूमिका मांडताना खडसे यांनी २२ जानेवारी रोजी आदेशच काढल्याचे सांगितले.
राज्यमंत्र्यांना अधिकार व काम देण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री घेतात. त्यानुसार मी त्यांच्याकडे स्वतंत्रपणे कार्यभार काही प्रकरणांमध्ये सुपूर्द केला आहे. त्याचबरोबर महसूल विभागाकडे अडीच हजार जमिनींची प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित आहे. त्यावर मी एकटा सुनावणी घेऊच शकणार नाही. त्यातील ५३ प्रकरणे त्यांच्याकडे सुनावणी व निर्णयासाठी पाठविली आहेत. आणखीही टप्प्याटप्प्याने पाठविली जातील. त्यांना देवस्थान इनाम जमिनी आणि धारण जमिनींचे एकत्रीकरण या दोन विषयांमध्ये अर्धन्यायिक स्वरुपाची प्रकरणे हाताळण्याचे अधिकार हवे आहेत. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची या विषयांबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरु आहे. त्यामुळे हे विषय त्यांच्याकडे सोपविलेले नाहीत. ते त्यांना कशासाठी हवे आहेत, असा सवाल खडसे यांनी केला.

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही