मुंबई :  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली अब्रुनुकसानीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करावी या मागणीसाठी अभिनेत्री कंगना राणावतने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तातडीचा दिलासा म्हणून महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही कंगनाने केली आहे.  अख्तर यांच्या तक्रारीची दखल घेऊन अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच कंगनाला समन्सही बजावले होते.