मध्य रेल्वेवर शुक्रवारी पहाटे सीएसटीच्या दिशेने जाणाऱया लोकलने धडक दिल्याने चार रेल्वे चर्मचाऱयांचा मृत्यू झाला. घाटकोपर-विद्याविहार स्थानकादरम्यान ही घटना घडली. रेल्वे कर्मचारी रात्रपाळी संपवून घरी परतत असताना चार कर्मचाऱयांना लोकलने धडक दिली. यात चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे चारही जण रेल्वेचे कंत्राटी कामगार होते. गोकूळ(१८), श्रवणभाऊ(१८), नाना(२७) आणि काशिनाथ (१९) अशी त्यांची नावे आहेत.