रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी २२ ते २४ ऑगस्ट रोजी शरद राव यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील रिक्षाचालकांनी घेतला आहे. बंद काळात कोकण विभागातील रिक्षा कोणाच्याही दबावाला बळी न पडता सुरळीत सुरू राहतील, असे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले.
कल्याणमधील आचार्य रंगमंदिरात संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणपती गौरीचे दिवस आले आहेत. प्रवाशांची अडवणूक करणे योग्य होणार नाही, असा विचार करून या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पेणकर यांनी सांगितले.