प्रा. बाळ आपटे यांनी विद्यार्थी चळवळीची तर्क शुद्ध मांडणी केल्यामुळे त्यांच्या नावे विद्यापीठात सुरू होणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध अभ्यास व संशोधन केले जाईल’, असा आशावाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केला. ‘विद्यार्थी चळवळीचे तत्त्वज्ञान विकसित करण्यात प्रा. आपटे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी जगभरातील विद्यार्थी चळवळींचा अभ्यास केल्यामुळे चळवळीचा दृष्टिकोन व्यापक असण्यावर कायम भर दिला. राष्ट्रीय युवा धोरणात सर्वसमावेशक बाबींचा अंतर्भाव व्हावा, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती, असे होसबळे यांनी नमूद केले. मुंबई विद्यापीठात ‘प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडण्ट्स अॅण्ड युथ मूव्हमेंट’चे कोनशिला अनावरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमवारी झाले. जगभरातील सामाजिक परिवर्तनाच्या रचनात्मक आणि आंदोलनात्मक बाबींमध्ये विद्यार्थी व युवक चळवळींचे मोठे योगदान लाभले आहे, असे मत राज्यपाल राव यांनी व्यक्त केले. ‘युवा शक्तीला संघटित करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देऊन भारताचे नाव उंचावण्याचे काम हे केंद्र करेल’, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे संवाद साधला. ‘आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे’ या प्रा. आपटे यांच्या विचारावर दृढ विश्वास ठेवून विद्यार्थ्यांशी संबंधित विषयांची तर्क शुद्ध मांडणी करण्याचे काम कें द्राच्या माध्यमातून के ले जाणार आहे. यातून आदिवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांवर काम करणारे सामाजिक नेते तयार होतील. या केंद्रात नेतृत्व विकासासाठी पाच दिवसांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आयसीएसएसआर, आयसीसीआर आणि आयसीपीआर यांसारख्या विविध राष्ट्रीय संस्थांशी संलग्न राहून विद्यार्थी व युवक चळवळीशी संबंधित अनेक पैलूंवर सखोल संशोधन करणारे ‘रिसर्च फे लो’ या केंद्राचा महत्त्वाचा घटक असणार आहे. याचबरोबर पीएच.डी.साठीचे संशोधनही या केंद्रात चालणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाने २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद के ली आहे. तसेच जिल्हा विकास निधीमधून केंद्राच्या बांधकामासाठी १२ कोटी ५४ लाख रुपये मुंबई विद्यापीठाला मंजूर करण्यात आले आहेत. या केंद्रासाठी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, रिसर्च फे लो, ग्रंथपाल आदी ११ पदांची निर्मिती करण्यात आली असून त्याचा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार आहे.