देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी देण्याच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अधिसूचना काढून गुरुवारी शिक्कामोर्तब केले. भारतीय बँक महासंघ, सरकार आणि बँकांच्या कर्मचारी संघटना यांच्यात २५ मे रोजी झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार हा निर्णय घेण्यात आला, असे बँक कर्मचाऱ्यांचे नेते आणि ‘एआयबीईए’चे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले. या करारावर ११ खासगी आणि सात विदेशी बँकांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.