पश्चिम रेल्वेचा गोंधळ कायम असून त्यात शुक्रवारी एका गाडीने सिग्नल तोडून पुढे धाव घेतल्याची भर पडली. बोरिवली येथे निघालेल्या या गाडीने कांदिवली येथे सिग्नल तोडूला आणि जवळपास पाच डबे पुढे गेल्यानंतर ती थांबली. रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेत ही गंभीर घटना असून अशा गफलतीमुळे अपघात ओढवण्याची शक्यता मोठी असते.