राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि मनोरंजनापासून क्रीडाक्षेत्रातील घडामोडींपर्यंत प्रत्येक गोष्टींवर तरुण पिढी फेसबुक, ट्विटर अशा समाजमाध्यमांवरून व्यक्त होत असते. मात्र, आपली मते विस्तृतपणे मांडण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही. हेच व्यासपीठ ‘लोकसत्ता’तर्फे ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.  ‘नाथे’प्रस्तुत या वक्तृत्व स्पर्धेला पृथ्वी एडिफाइस आणि जनकल्याण सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे.    स्पध्रेचे नियम, अटी आणि प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळाला भेट द्या:
indianexpress-loksatta.go-vip.net/vaktrutvaspardha