महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. सरकारला १६९ आमदारांनी समर्थन दिले, तर ४ आमदार तटस्थ राहिले. भाजपाच्या सर्व आमदारांनी यावेळी सभात्याग केल्याने विरोधात शून्य मतदान झाले.