आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग शासनावर नाराज असल्याने त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.