करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे.
महाराष्ट्रात लॉकडाउनसंबधी ट्विटरवर मीम्स
Lockdown to people in Maharashtra:: pic.twitter.com/lNAqIZkZHn
— Being Singh (@definitely_7not) April 4, 2021
After seeing #maharashtralockdown
trending people be like pic.twitter.com/joKfX856dE— Yashraj Chauhan (@iam_yashraj) April 4, 2021
Here it is#maharashtralockdown pic.twitter.com/Ps4m1Rezaq
— Kshitij wadia (@IMKshitijwadia) April 4, 2021
After listening lockdown guidelines everyone be like :#maharashtralockdown pic.twitter.com/DGoMPuvSD4
— Vinayak (@VinayakDPandey_) April 4, 2021
Mumbaikars right now : #maharashtralockdown pic.twitter.com/BBmI16j6rq
— Mr. Stark (@Mr_Stark_) April 4, 2021
Maha govt announces weekly lockdown
Le Corona to Govt…
#maharashtralockdown#UddhavThackeray pic.twitter.com/COEpRu0C6Z
— Shana Patekar (@bhaveshkjha) April 4, 2021
Govt : wear mask ,stay safe & avoid gathering
Mumbaikars at Juhu beach : #maharashtralockdown pic.twitter.com/kCVJLXiVsy
— Tweetera (@DoctorrSays) April 4, 2021
Students in Maharashtra after hearing the lockdown news#maharashtralockdown pic.twitter.com/7AcTqDRIbn
— A-cashhh (@whateverakash) April 4, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा 144 कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले.
काय सुरू काय बंद?
राज्यात आठवड्याला लॉकडाउनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील, अशी माहिती मलिक यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2021 7:22 pm